कंबखत दैव

Posted by सत्यजित माळवदे in

त्या जादूई क्षणात सांग काय दडले होते
मन काबुत नसताना सांग काय घडले होते

तव गोर्‍या नितळ कांती लव सांजेच्या उन्हाची
फुलल्या श्वासास संध्येचे पिसे जडले होते

अधरामृतात तुझ्या आकंठ संजीवताना
माळुन केसात जुई चांदणे उघडले होते

भाळी ठेवले ओठ सैल केली मिठी जराशी
पण रुणझुणत्या पैजणांत पाउल अडले होते

ढळला हळुच हुंदका अबोला बोलून गेला
तुझ्या पावलांत आसवांचे फुल पडले होते

सोडवून गेलो हात वळवाची होती रात
होता पाऊस खरा का आभाळ रडले होते

न सरली अजुन रात्र ती उरली उरात माझ्या
का कंबखत दैवाने मलाच निवडले होते?...

-सत्यजित.

This entry was posted on Wednesday, 29 October 2008 at 4:11:00 PM and is filed under . You can follow any responses to this entry through the comments feed .

0 comments

Post a Comment