रिटायरमेंटची सकाळ
जिवनाची संध्याकाळ
मिणमीणते डोळे
टाळू पर्यंत कपाळ
कपाळवर आट्या
भेडसावणारे विचार
ईच्छाशक्ती असते
सांधेदुखीने लाचार
जाड भिंगाच्या चष्म्यातून
जेव्हा भुतकाळात पाहीलं
बरच काही केल तरी
बरच काही राहीलं
अरे बाप आहे मी तुझा
असं सांगाव का लागतं?
हक्काने पॉकेटमनी घेणार्याकडे
आज मागाव का लागतं?
आता कमी जरी दिसलं
तरी मनं वाचता येतात
सबबीचे खडे नुसत्या
बोटांनीच वेचता येतात
प्रत्येक घासागणिक हात
आता जास्तच थरथरतात
नुसता मायेच्या स्पर्श मागता
उच्श्वास नुसतेच घुरघूरतात
हाताचा पाळणा माझा
आता पुरता गंजला आहे
राजाच्या गोष्टीतला महल
पडका पत्त्यांचा बंगला आहे
आपल्याच पोटचाच गोळा
झाल्या चुकांवर बोट ठेवतो
कालचा देव्हार्यातला दिवा
आज अडगळीत एकटाच तेवतो
हातात कोंबल्या जपमाळेतील
राम देखिल मरा होतो
’अयुष्य एक जुगार’
येवढाच शाप खरा होतो?
-सत्यजित.
This entry was posted
on Monday, 16 June 2008
at 6:46:00 PM
and is filed under
थोडं हळव
. You can follow any responses to this entry through the
comments feed
.

