आता श्रावण संपला, आणि नारळी पोर्णिमा पण झाली आता रहावत नाही हो... तळलेल्या माशांचा आणि तिरफळ घातलेल कालवणाचा तो घमघमाट आता मनाचा ठाव घेत आहे... आणि मन लहान होउन गात आहे...
असावा सुंदर पापलेटचा बंगला
चंदेरी रुपेरी सुरमईचा चांगला
पापलेटच्या बंगल्याला सारंग्याचे दार
धार धार डेंग्यांच्या कुर्ल्या पाहरेदार
गोल गोल कोळंब्यांच्या खिडक्या दोन
हॅल्लो हॅल्लो करायला शंखांचा फोन
मांदेल्यांचा सोनेरी रंग छानदार
बांगड्यान्ना अंगभर खवले फार फार
बंगल्याच्या छतावर कालवा रहातो
शिंपीतल्या तिसर्यांशी लपाछपी खेळतो
लांब लांब करल्यांचा नाच रंगला
बोंबलाचा मासा मस्त चांगला...
कित्ती कित्ती चविचा पापलेटचा बंगला
सोलकढी भातासंगे मस्त हाणला...
-सत्यजित.
This entry was posted
on Monday, 8 September 2008
at 10:31:00 PM
and is filed under
विडंबन
. You can follow any responses to this entry through the
comments feed
.

