आई... हळुहळू हळुहळू सुर्य कुठे गेला?
जाता जाता सांग त्याने प्रकाश का नेला?

ठेवुन जा प्रकाश म्हणाले मी त्याला जाताना
नाही म्हणाला उद्या आणिन सोबत पुन्हा येताना
अंधाराची भीती सांग वाटते का त्याला?
आई, अंधाराची भीती सांग वाटते का त्याला?...

थांब म्हणाले थोडा वेळ येतिल चांदण्या आकाशात
त्या म्हणाला येणार नाहीत येवढ्या माझ्या प्रकाशात
खरच सांग चांदण्या का घाबरतात त्याला? आई...

ऐकत नाहीस माझं काहीच आहेस किती हट्टी रे
चांदोबाशी सांग कशाला घेतलिस उगा कट्टी रे
चांदोबाशी बट्टी घ्यायला सांग ना तू त्याला.. आई...

थांब म्हटलं थोडा वेळ मिळुन सारे खेळू खेळ
जायला हव म्हणाला आता घालवुन चालणार नाही वेळ
संध्याकाळीची सांग त्याला असते का शाळा? आई...

-सत्यजित

This entry was posted on Tuesday, 16 September 2008 at 6:51:00 PM and is filed under . You can follow any responses to this entry through the comments feed .

1 comments

:)

pan mala tuzya mothyanchya kavitach jaast awadataat... like Meera!

18 September 2008 14:39

Post a Comment